भटक्या जमातीच्या स्त्रियांची आत्मकथने
डॉ.सतेज दणाणे हे कृतिधर्मी व्यक्तिमत्त्व. सामाजिक व वाङ्मयीन ऊर्मी त्यांना कधीही स्वस्थ बसू देत नाही. सामाजिक कार्य असो वा ‘वारूळ’ सारखे दर्जेदार वाङ्मयीन नियतकालिक असो, दोहोंच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक व वाङ्मयीन क्षेत्रात आपली मुद्रा उमटवली आहे. त्यांच्या सामाजिक व वाङ्मयीन क्षेत्रातील सक्रियतेतून त्यांचा ‘भटक्या जमातीतील स्त्रियांची आत्मकथने’ हा अभ्यासग्रंथ सिद्ध झाला आहे.
‘आत्मकथन’ या संज्ञेने मराठी साहित्याचा परिघ विस्तारला. चाकोरीबद्ध आत्मचरित्रांच्या आशय, विषय, आकृतिबंध व भाषिक सीमारेषा ओलांडल्या. आत्मकथनांनी केलेले ऐतिहासिक सीमोल्लंघन हेे डॉ.दणाणेंच्या विवेचनाचे मुख्य सूत्र आहे. भटक्या समाजातील स्त्रियांच्या आत्मकथनांचे विवेचन करताना त्यांंनी स्वीकारलेला सामाजिक, सांस्कृतिक व भाषिक परिप्रेक्ष्य अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘मरणकळा’ व ‘तीन दगडाची चूल’ या आत्मकथनांनी भटक्यांचे भावविश्व व बोलीद्वारे मराठी साहित्य व भाषावैभवामध्ये कशा प्रकारे समृद्ध केले, याचे समर्पक विवेचन या ग्रंथात आहे. ‘भटक्या समाजातील स्त्रियांची आत्मकथने’ हा ग्रंथ पारंपरिक अभ्यासापेक्षा आपल्या वेगळ्या भूमिकेेेेेेमुळे मराठी वाचक, अभ्यासक व संशोधकांना समाधान देतो.
-कैलास अंभुरे
Comments
Post a Comment